लाभार्थी जिवंत असूनही ग्रामसेवक व सरपंचानी दाखवला मयत,वारसही नसल्याची ग्रामपंचायत ठरावात केली नोंद, दोषींवर कडक कारवाई करा.

- Advertisement -spot_img

तक्रारदार भागवत भुजंग जायभाय यांचे दुसर्‍या दिवशीही आमरण उपोषण सुरूच

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथे प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील लाभार्थी भुजंग जायभाय हे जिवंत असूनही ग्रामपंचायतीच्या ठरावात ग्रामसेवक राजेंद्र वळेकर व सरपंचानी मयत दाखवण्याचा प्रताप केला आहे. याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर आज दि. २४ मार्च रोजी प्रत्यक्ष आमरण उपोषण सुरू केले आहे.

दि. १७ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदी संबंधितांना लेखी तक्रार देऊनही काहीच कारवाई न झाल्याने कालपासून प्रत्यक्ष उपोषण सुरू करण्यात आले आहे.

याबाबत तक्रारदार भागवत भुजंग जायभाय यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथील माझे वडील भुजंग माणिक जायभाय यांचे नाव २०२४ ते २०२५ या वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले होते. परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने सदर लाभार्थी हयात असताना मयत असल्याचे २९ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेच्या ठरावात दाखवले. तसेच त्यांना वारसदार देखील नाहीत, असेही ठरावात नमूद केले. परंतु लाभार्थी भुजंग माणिक जायभाय हे सध्या हयात आहेत. त्यांना दोन मुले व तीन मुली आहेत. असे असताना ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने मनमानी कारभार करून या योजनेतून लाभार्थ्यांला वंचित ठेवले.

तरी या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा वारसदार मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, विधानपरिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार रोहित पवार यांना पाठवलेल्या आहे.

यावेळी करण्यात आलेल्या मागण्या

१) पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजुर असणारे घरकुल तात्काळ मिळावे.

२) लाभार्थी जिवंत असतांना मयत दाखवलेल्या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.

३) ग्रामस्थ व लाभार्थी न्याय मागणीसाठी पंचायत समिती मध्ये गेले असता आरेरावीची भाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा