सैनिकांप्रमाणे आपणही देश सेवा करावी- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी.

- Advertisement -spot_img

कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना.

जामखडे प्रतिनिधी
26 जुलै कारगिल विजय दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो राष्ट्रीय छात्र सेना १७ महाराष्ट्र बटालियन अहिल्यानगर जामखेड मध्ये एनसीसीच्या वतीने कारगिल विजय दिवस अतिशय मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते शहिदांना पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी , प्राचार्य सुनील पुराणे , प्राचार्य पारखे बी ए, प्राचार्य मडके बी के, उप प्राचार्य सुनील नारके, कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे,  सेकंड ऑफिसर मयूर भोसले,प्रा अविनाश फलके,प्रा आण्णा मोहिते, पोलीस हवालदार हनुमंत अडसूळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव व शिक्षक एनसीसी कॅडेट उपस्थित होते.

प्राचार्य सुनील पुराणे , प्राचार्य पारखे बी ए, प्राचार्य मडके बी के यांनी कारगिल दिनाचे महत्त्व सांगितले.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मनोगतात सांगितले की भारतीय सैनिकांनी जीवाची परवा न करता कारगिल युद्ध जिंकले आपली नोकरी व सैनिकाची नोकरी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे .सैनिक सर्व परिवार सोडून आपल्यासाठी रात्रंदिवस सीमेवर लढत आहेत  त्यांचे या वीरमरणामुळे कारगिल विजय दिवस प्राप्त झाला. या दिनाचे स्मरण झालेच पाहिजे. हा उपक्रम आयोजित केल्याने विद्यार्थी व सर्वांमध्ये देशप्रेम निर्माण होते.  सैनिकांप्रमाणे आपणही देश सेवा करावी व भारतीय सेनेमध्ये दाखल व्हावे असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

जामखेड महाविद्यालय,ल ना होशिंग विद्यालय व रयतचे श्री नागेश विद्यालय जामखेड एनसीसी युनिटच्या वतीने कारगिल शहीद जवान स्मारकास मानवंदना देण्यात आले प्रास्ताविक  गौतम केळकर ,सूत्रसंचालन अनिल देडे, आभार प्रदर्शन मयूर भोसले यांनी केले.
कमांडिंग ऑफिसर  कर्नल प्रसाद मिजार, ॲडम ऑफिसर कर्नल निकीत नेगी, सुभेदार मेजर राजेश कुमार यांनी देशभक्ती उपक्रमाचे अभिनंदन.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा